देवळी कराड असो वा देवळी हे गाव. ही गावे खरेतर लहान-लहान आदिवासी पाडी आहेत. ती नंतरच्या काळात वसली; मात्र त्यापूर्वी हा परिसर मोठा इतिहास घेऊन जगत असणार यात शंका नाही. याच इतिहासाच्या या पाऊलखुणा जपण्याची गरज आहे. तरच नाशिकच्या इतिहासाची कवाडे कायम खुली राहतील, अन्यथा आपण एकएक करून सर्वकाही हरवून बसू. याचं भान नावातच देव अन् त्याचं घर असलेली देवळी ही दोन्ही गावे देतात. मंदिरं कशी निर्माण झाली असतील. याचा एक नमुना देवळी कराडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले देवळी नावाच्या गावात पहायला मिळतो. या गावाला देवळी वणी असेही म्हणतात. हे गाव तेव्हा वणी संस्थानच्या अंतर्गत असल्याने गावाला देवळी वणी म्हटले गेले असावे. या गावात मंदिराच्या गर्भगृहाचीच बांधणी झालेला दगडांचा ढाचा आहे. हा ढाचा पाहिला की, येथेही देवळीकराडसारखं मंदिर उभे राहण्याच्या तयारीत होते; मात्र ते अचानक बंद पडलं असावे असे वाटते. या ढाच्यामुळे मंदिराची निर्मिती होत असताना पहिल्यांदा गर्भगृह कसा आकार घेत असेल हे पहायला मिळतं. देवळी गावातील हनुमान मंदिराच्या शेजारी पाच फूट उंचीच्य
आयुष्यात पहिल्या वेळेस ट्रेकिंग का जाणार होतो ते म्हणजे ९/१२/२०१९ ल सकाळी आणि ते म्हणजे धोडप किल्ला..थंडी चे दिवस आणि सकाळी साखर झोप मिळून जाणे खूप अवघड होणार होते पण मित्रां मुळे गेलो आणि संपूर्ण दिवस चडण्यात आणि उतर्ण्यात गेला पण त्या नंतर ते मी निते नियम पाळले आणि जवळ पास दर रविवारी एक किल्ला असे चालू झाले.. राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. येथेच त्यांची दिलजमाई झाली होती. पुढे इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला. धोडप किल्ल्याची इतर नावे धुडप, धरब, धारब आहेत.
Comments
Post a Comment