पंच रथी मंदिर ( हेमाडपंथी मंदिर ) ,देवळी वणी..

















देवळी कराड असो वा देवळी हे गाव. ही गावे खरेतर लहान-लहान आदिवासी पाडी आहेत. ती नंतरच्या काळात वसली; मात्र त्यापूर्वी हा परिसर मोठा इतिहास घेऊन जगत असणार यात शंका नाही. याच इतिहासाच्या या पाऊलखुणा जपण्याची गरज आहे. तरच नाशिकच्या इतिहासाची कवाडे कायम खुली राहतील, अन्यथा आपण एकएक करून सर्वकाही हरवून बसू. याचं भान नावातच देव अन् त्याचं घर असलेली देवळी ही दोन्ही गावे देतात.
  मंदिरं कशी निर्माण झाली असतील. याचा एक नमुना देवळी कराडपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले देवळी नावाच्या गावात पहायला मिळतो. या गावाला देवळी वणी असेही म्हणतात. हे गाव तेव्हा वणी संस्थानच्या अंतर्गत असल्याने गावाला देवळी वणी म्हटले गेले असावे. या गावात मंदिराच्या गर्भगृहाचीच बांधणी झालेला दगडांचा ढाचा आहे. हा ढाचा पाहिला की, येथेही देवळीकराडसारखं मंदिर उभे राहण्याच्या तयारीत होते; मात्र ते अचानक बंद पडलं असावे असे वाटते. या ढाच्यामुळे मंदिराची निर्मिती होत असताना पहिल्यांदा गर्भगृह कसा आकार घेत असेल हे पहायला मिळतं. देवळी गावातील हनुमान मंदिराच्या शेजारी पाच फूट उंचीच्या वीरगळींचा समूह सोहळा अनुभवणे हा देखील अनोखा अनुभव ठरतो. त्यावरील सैनिकांची शिल्पे आपल्याला युद्धभूमीची आठवण करून देतात. वीरगळींच्या शेजारीदेखील दगडी बांधणीचे मोठे मंदिर असेल, असे आजूबाजूला पडलेल्या मंदिराच्या अवशेषांवरून लक्षात येते.

Comments

Popular posts from this blog

धोडप किल्ला...आयुष्यात पहिला ट्रेक..

Indrai fort..